Uncategorizedआपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरमहाराष्ट्रसामाजिक
जिल्ह्यात शांतता राखण्याचे प्रशासनाकडून जाहीर आवाहन
सोलापूर(युवापर्व) : जालना जिल्ह्यातील अंतरवली- सराटी येथे मराठा आरक्षणाच्या संबंधाने घडलेल्या घटनेवरून समाजमाध्यमांमध्ये येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच समाजमाध्यमात समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारित करू नयेत, जेणेकरून सदर संदेशवरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची दक्षता सोलापूर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच आपल्या जिल्हात शांतता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती मा. कुमार आशिर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर, मा.शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा.डाॅ.राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी केली आहे.